पुणेकर कोकणवासीयांना आता गणेशोत्सवासाठी गावी जाताना टोल माफी…. चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव हा जल्लोषात पार पडणार आहे. चाकरमान्यांची कोकणात जाण्याची तयारी देखील सुरु झाली आहे. या चाकरमान्यांना आपल्या गावी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मोफत बस सेवा देण्यात आली आहे. पुण्यातील कोकणवासीयांसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एक खास मागणी केली होती. ती म्हणजे टोल माफीची. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने पुणेकर कोकणवासीयांना आता गणेशोत्सवासाठी गावी जाताना टोल भरावा लागणार नाही.