पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला “अब की बार, ४०० पार”चा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क वाढवा – चंद्रकांत पाटील

16
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र निवडणुकीच्या प्रचाराचे चित्र पाहायला मिळत आहे. याच अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ आणि ३१ मधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला “अब की बार, ४०० पार”चा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक बूथवरील कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क वाढवला पाहिजे, असे आवाहन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना केले.
यावेळी, उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश चिटणीस ॲड.वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दीपक पोटे, राजेश येनपुरे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, प्रभाग अध्यक्ष ॲड.प्राची बगाटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे यांच्या सह भाजपाचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.