खतांच्या सब्सिडीबद्दल केलेल्या वक्तव्यांतून उद्धवजी ठाकरे यांना या विषयाची अपुरी माहिती असल्याचे स्पष्टच होते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2024/04/WhatsApp-Image-2024-04-23-at-4.56.56-PM-750x430.jpeg)
मुंबई : विदर्भातील एका सभेत उद्धव ठाकरे यांनी खतांच्या सब्सिडीबद्दल भाषण केले आणि मोदी सरकारवर टीका केली. यावरून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना चोख प्रत्युउत्तर दिले . ते म्हणाले कि,अपुरी माहिती असलेल्या विषयावर बोलून कधी कधी बोलणाऱ्याची पंचाईत होते. खतांच्या सब्सिडीबद्दल केलेल्या वक्तव्यांतून उद्धवजी ठाकरे यांना या विषयाची अपुरी माहिती असल्याचे स्पष्टच होतेय. पण त्यामुळे मोदी सरकार आपल्यासाठी काय काय करतंय, हे शेतकऱ्यांना व्यवस्थित समजले. त्याबद्दल तुमचे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.