पुण्यातील सदाशिव पेठ अपघात प्रकरणातील जखमींची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संचेती रुग्णालयात घेतली भेट

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने १२ जणांना धडक दिली होती. यापैकी तिघांची संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिघांची आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांनाही तिघांवर उत्तम उपचार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. यावेळी भाजपचे प्रमोद कोंढरे, रमाकांत कापसे आणि सुनील पांडे उपस्थित होते.
पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा अपघात झाल्याची घटना घडली, एका भरधाव कारने 12 जणांना उडवले. या अपघातात एमपीएससीचे विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील ३ जणांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन अपघात प्रकरणातील प्रकरणाच्या कारवाईचा आढावा पोलिसांकडून घेतला. कारमालक, चालक आणि त्याच्या सोबतच्या सहप्रवाशाला ताब्यात घेतलं असून, कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांनी दिली.
पुण्याच्या अतिशय मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठेत हि अपघाताची घटना घडली. या भागात अनेक अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकांमध्ये शेकडो विद्यार्थी तासंतास अभ्यास करत असतात. या दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काही विद्यार्थी श्री साईनाथ अमृततुल्य या चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांचा मोठा घोळका या चहाच्या दुकानाबाहेर होता. पण हा घोळका न पाहता एका भरधाव कारने 12 जणांना उडवलं. ज्यामध्ये ३ जण अतिशय गंभीररित्या जखमी झाले.