पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या लोककल्याणकारी कामगिरीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे पत्रकारांशी साधला संवाद

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या लोककल्याणकारी कामगिरीवर माध्यमांशी संवाद साधला. १५ वर्षे सलग मुख्यमंत्री, त्यानंतर ११ वर्षे सलग पंतप्रधान हा भारतीय राजकारणातीलच नाही तर, संपूर्ण जगातला रेकॉर्ड आहे. लोकांना त्यांनी केलेली अंमलबजावणी पटली म्हणून त्यांना मतंही मिळत राहिली. यावेळी पाटील यांनी मोदींच्या नेतृत्वाची आणि स्वभावाची काही वैशिष्टय यावेळी मांडली. प्रश्न उपस्थित करून पळून जाण्याचे काम राहुल गांधी, संजय राऊत आदींसारखे करतात. मात्र, देशातील १४५ कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत व्यक्त केले.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील यांनी मोदी सरकारच्या कारकिर्दीचा आढावा घेताना सांगितले, गेल्या अकरा वर्षांत सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना आहेत. तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. देशाच्या सीमा मजबूत केल्या. तसेच तंत्रज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पाटील यावेळी म्हणाले, हा पहिला नेता आहे ज्याने सर्वसामान्य माणसाला आपल्या कवेत घेतलं. त्यांनी आवाहन केल्यावर देशातील विरोधी पक्ष नेता देखील त्याची अंमलबजावणी करतो. उदाहरण द्यायचं झालं तर स्वच्छता मोहीम. कोविड काळात थाळी वाजवा चे आवाहन केले. लॉकडाऊन, व्हॅक्सिन घेण्यासाठी आवाहन .मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. याचबरोबर अत्याधुनिक यंत्रणांच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर झाला. देशातील शस्त्रास्त्र निर्यात ३४ पटीने वाढून २३ हजार ६२२ कोटींवर पोहचली. नक्षलग्रस्त भागाचा विकास करून नक्षलमुक्तीच्या दिशेने निर्णायक वाटचाल सुरू केली आहे. हरघर जल, निवास योजना या माध्यमातून सामान्यांच्या गरजेच्या योजनांना केंद्र सरकारने अग्रस्थान दिले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात मोदींनी सर्वसामान्य माणसाला सुविधा पुरविल्या , दुसऱ्या टप्प्यात देशाच्या अस्मिते संबंधित अनेक विषय पूर्ण केले. देश आर्थिक बाबतीत पुढे कसा जाईल याबाबत त्यांनी विचार केला. २०४७ साली जेव्हा देशाच्या स्वतंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा अप्लाय देश जगामध्ये एक आर्थिक महासत्ता बनवायचं स्वप्न, अशी सर्व माहिती या पत्रकार परिषदेतून पाटील यांनी दिली.