गणेशोत्सवासाठी वसई आगारातून कोकण विभागाकडे विशेष एस.टी. बससेवा उपलब्ध करून देण्याची आमदार स्नेहा दुबे यांची मागणी

67

 

मुंबई : गणेशोत्सवात मुंबई तसेच उपनगरातील लाखो चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जात असतात. याच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या मूळ गावी जाणाऱ्या भाविक नागरिकांच्या सोयीसाठी वसई आगारातून कोकण विभागाकडे विशेष एस.टी. बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदनत्यानी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विधान भवन येथे दिले.

प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात लाखो नागरिक आपल्या मूळ गावाकडे, विशेषतः कोकणात, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी व पूजेसाठी जात असतात. मात्र, या काळात एस.टी. बससेवेची अत्यंत कमतरता जाणवते. भाविकांना तिकीट मिळण्यात अडचणी येतात, तसेच प्रवासात गैरसोयीचा सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर, २२,२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी विशेष एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. यामुळे वसई मतदारसंघातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावात जाणे अधिक सुलभ व सुसज्ज होईल असे त्यांनी म्हंटले आहे.

“गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. कोकणात गणपती घरी नेण्याची लोकांची आसक्ती व श्रद्धा लक्षात घेता एस.टी. महामंडळाने विशेष बसेसची योजना आखावी. ही सेवा सुरु झाल्यास वसईतील नागरिकांची मोठी गैरसोय टळेल.” या मागणीस लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी विधानभवनात संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशीही चर्चा केली असल्याचे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.