देशातील ज्येष्ठ नागरिक संघ हे ऋषी संघ व्हायला पाहिजेत, ज्येष्ठांनी आपलं उर्वरित आयुष्य राष्ट्र निर्माणासाठी दिलं पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : प्रभू श्रीराम यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपा कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या माध्यमातून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे अनमोल विचार ऐकले.