गुन्हेगारी घटना घडू नयेत, नागरिकांमध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा – क्राईम टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

12

सांगली : सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी, तसेच, गुन्हेगारी घटना घडू नयेत, नागरिकामध्ये सुरक्षित सांगलीचा आत्मविश्वास निर्माण करावा, असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सांगली शहरच्या पोलीस उपाअधीक्षक विमला एम. प्रत्यक्षात व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, सांगली, मिरजसारख्या शहरात गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे १० हजार लोकसंख्येच्या परिक्षेत्रासाठी छोट्या चौक्या निर्माण कराव्यात. तिथे गस्त देण्यासाठी तीन पाळीत गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांना नेमावे. त्यांची अदृश्य भीती निर्माण करावी. पोलिसांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडावे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत घ्यावी. सीसीटीव्ही बसवावेत, असे त्यांनी सूचित केले.

क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा दर आठवड्याला घेणार असल्याचे सांगून पाटील म्हणाले, अतिरीक्त पोलिस अधीक्षक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांची बैठक घेऊन वेळोवेळी घटनानिहाय आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, पोलिसांनी सामाजिक उत्तरदायित्व पार पाडावे. सर्वसामान्य माणसाला निर्भय वाटावे, या पद्धतीने कामकाज करावे, असे ते म्हणाले. तर अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस विभागाची कामगिरी, गुन्हेगारी घटनांचा आढावा सादर केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.