पाच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांना मुंबई व नवी मुंबईमध्ये आशयपत्र अधिकृतरीत्या प्रदान कार्यक्रम केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न

9

मुंबई : आज ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे झालेल्या एका ऐतिहासिक सोहळ्यात, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, पाच आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विद्यापीठांना मुंबई व नवी मुंबईमध्ये त्यांच्या शैक्षणिक कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (Letters of Intent – LOIs) अधिकृतरित्या प्रदान करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी केंद्रीय शिक्षण सचिव तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष विनित जोशी,अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ब्रिटनच्या उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ऑस्ट्रेलियाचे कॉन्सुल जनरल पॉल मर्फी,अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हॅंकी, इटलीचे कॉन्सुल जनरल वॉल्टर फेरारा, अ‍ॅबर्डीन विद्यापीठाचे उपप्राचार्य ग्लोबल एंगेजमेंट प्रा.सिलादित्य भट्टाचार्य, यॉर्क विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. चार्ली जेफ्री, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ उपकुलगुरू गॉय लिटलफेअर, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष इलिनॉय टेक राज ईचंबाडी, आयईडी चे रिकार्डो बाल्बो,अधिष्ठाता,विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रमामध्ये खालील पाच प्रतिष्ठित विद्यापीठांचा समावेश आहे:
1. Aberdeen University (स्कॉटलंड)
2. University of York (युनायटेड किंगडम)
3. University of Western Australia (ऑस्ट्रेलिया)
4. Illinois Institute of Technology (यूएसए)
5. Istituto Europeo di Design – IED (इटली)

यामुळे भारतात जागतिक दर्जाचे उच्च शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार असून, भारतीय विद्यार्थ्यांना देशातच राहून आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे, उद्योगाभिमुख आणि व्यावसायिक कौशल्याधारित शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विशेषतः रोजगारक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी हे अभ्यासक्रम व्यावसायिक क्षेत्राशी प्रत्यक्ष जोडलेले असतील. ही भागीदारी केवळ शिक्षणपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला एक जागतिक शिक्षण हब बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची गरज राहणार नाही कारण आज राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरणातंर्गत पाच परदेशी विद्यापीठांसोबत आशयपत्र प्रदान केले आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब मुंबई, नवी मुंबईत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळपरिसरात ही विद्यापीठे उभी राहणार आहेत.याचं परिसरात येत्या काही वर्षात मेडिसिटी,स्पोर्टस सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारणारण्यात येणार आहे. येथे आगामी कालावधीत दहा विद्यापीठ एकत्र येतील अशी संकल्पना राबवण्यिाचा विचार आहे. सध्या या पाच विद्यापीठांमुळे हा परिसर पूर्ण शिक्षण आणि संशोधन साठी ओळखला जाईल.मुंबईची सध्या वित्तीय,औद्योगिक आणि मनोरंजन उद्योगाचे शहर म्हणून ओळख आहे. विद्यापीठामुळे एज्युकेशनल सिटी अशी ओळख होईल.विकसित भारत २०४७ मध्ये हा निर्णय महत्वाची भूमिका बजावेल.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की,मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे त्याचबरोबर ही आर्थिक राजधानी देखील असून आगामी कालावधीत मुंबई येथे शिक्षणाचे हब होण्यासाठी परदेशी पाच विद्यापीठांचा खूप महत्त्वाचं योगदान राहील. भारत हा प्राचीन काळापासून शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर नावलौकिक राहीला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतची स्वप्न साकारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामुळे जागतिक पातळीवरच्या विद्यापीठांना देखील आपल्या संस्था भारतात सुरू करता येणार आहेत त्याचबरोबर भारतातील शिक्षण संस्थांना परदेशामध्ये आपल्या शाखा उघडता येणे शक्य होणार आहे.

या प्रसंगी केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, विविध शासकीय वरिष्ठ अधिकारी तसेच सहभागी विद्यापीठांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.