केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे : केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने “24 तास जनसंपर्क कार्यालय” शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे ” प्रथम माणूस” पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन आज बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. मोहोळ यांच्या या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ, खा. मेधाताई कुलकर्णी, आ. भीमरावआण्णा तापकीर, सुनीलजी कांबळे, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, संजय भोसले, आरपीआय नेते परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, श्रीनाथ भिमाले, गणेश बीडकर, राहुल भंडारे, गणेश कळमकर,राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, रवींद्र साळेगावकर,बापू मानकर, वर्षा तापकीर, मोनिका मोहोळ उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेळ्या संधी देत असतो. भाजप पक्ष हा पुढील पिढी देखील दूरदृष्टीने तयार करत असतो. मुरलीधर मोहोळ हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपरा प्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोना काळात मोहोळ यांनी नियोजनबद्ध काम केले त्यामुळे देशात त्यांचे नाव झाले. सदर काळात विविध क्षेत्रासाठी आणि लोकांकरिता त्यांनी अतुलनीय काम केले. संयम न सोडता आणि पाठपुरावा करून त्यांनी आपले काम आतापर्यंत केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
पुणे ते मुंबई दरम्यान द्रुतगती महामार्गावर जो मिसिंग लिंक तयार होत आहे त्यामुळे अर्धा तास प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. देशातील सर्वात लांब नऊ किलोमीटर बोगदा,देशातील सर्वात उंच केबल पूल याठिकाणी तयार होत आहे. तसेच पुण्यात दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच तयार केला जाईल पण नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरु होत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, आजचा कार्यक्रम हा घरातील कार्यक्रम असण्यासारखा समजत सर्वांनी मोठी गर्दी केली आहे. मुरली ते अण्णा , असा खासदार मोहोळ यांचा प्रवास अविश्वसनीय आहे. ते प्रथमच खासदार झाले आणि थेट मंत्री कसे झाले असा अनेकांना प्रश्न पडला . पण हि वस्तुस्थिती आहे. भविष्यात अण्णा आणखी मोठा होईल. आता ते आपले राष्ट्रीय नेते झाले आहे. अण्णाच्या प्रगतीमुळे सर्वजण आनंदित आहे. अण्णा त्यांचे आईवडील यांचे आशीर्वाद आणि पत्नीची साथ यामुळे प्रगती करत आहे. अल्पावधीत विविध पदावर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघात जनता दरबार घेऊन प्रचंड जनसंपर्क त्यांनी लोकांशी केलेला आहे. केंद्रात काम करत असताना पुण्यातील प्रश्नावर देखील लक्ष असू द्यावं असं आवाहन देखील पाटील यांनी मोहोळ यांना केलं.
मोहोळ म्हणाले, सहकारी बॅंकेतील शिपायाच्या पोराला केंद्रीय सहकार राज्यमंत्री केलं, हे फक्त भाजपातच घडू शकतं ! पुण्यात आता २४ तास खासदार कार्यालय सुरू राहील आणि लोकांना विविध योजना लाभ एका ठिकाणी मिळू शकेल. कोरोना काळात लोकांशी संवाद साधण्यासाठी २८ महिने ऑनलाईन सोशल मीडियावर संपर्क केला. यावेळी संबंधित भयानक काळात आलेले चांगले आणि वाईट अनुभव बाबत पुस्तक लेखन केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आता जनता दरबार घेऊन लोकांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. राज्यात कोण कसे काम करते यावर वरिष्ठ नेते लक्ष्य ठेवून असतात,मला मंत्रिपद मिळाले तेव्हा विश्वास बसत नव्हता. पक्ष नेतृत्व, माझे सहकारी यांचा विश्वास माझ्यावर असल्याने मी जबाबदारीने काम करू शकलो. ज्या ठिकाणावरून मी निवडून आलो तेथील कामास माझे सदैव प्राधान्य राहणार आहे. प्रामाणिकपणे माझे काम आगामी काळात पार पाडण्याची जबाबदारी निश्चित पार पडेल असा विश्वास त्यांनी यावेळी मोहोळ यांनी व्यक्त केला.