जनावरांचे आरोग्य धोक्यात..
चाऱ्याची कमतरता आणि पिण्यासाठी गढूळ पाणी

बीड जिल्ह्यातील इमामपूर येथील चारा छावण्यांची अवस्था अत्यंत बिकट असून स्थानिक शेतकरी, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील परिस्थिती जैसी कि तैसी आहे. चाऱ्याची कमतरता आणि पिण्यासाठी गढूळ पाणी यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
