१२ तारखेच्या अमरावती हिंसाचार घटनेवर यशोमती ठाकूर गप्प का? – देवेंद्र फडणवीस

11

अमरावती: अमरावतीमध्ये एका विशिष्ट गटाकडून हिंसाचार पेटवण्यात आला असल्याचा संशय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीमध्ये १३ नोव्हेंबरला जो हिंसाचार उफाळला तो १२ नोव्हेंबरला घडलेल्या घटनेवर आधारित होता. १२ तारखेला मोर्चे काढण्यात आले त्यामध्ये दगडफेक करण्यात आली त्यामुळे ही घटना सुनियोजित होती असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १२ तारखेच्या घटनेवर राज्य सरकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकून गप्प का आहेत. केवळ मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी मौन धारण केलय का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील दंगलीच्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर फडणवीस म्हणाले की, अमरावतीमध्ये १२ तारखेला मोर्चा निघाला पहिल्यांदा याला परवानगी होती का नव्हती, होती तर किती लोकांची परवानगी होती, परवानगी दिली होती का नव्हती, कोणी परवानगी दिली याची चौकशी झाली पाहिजे.

हा मोर्चा झाल्यानंतर समाज कंठकांनी दुकाने, लोकांना टार्गेट केले यातून स्पष्ट दिसत आहे की, दंगा घडवायचा होता त्यामुळे विशिष्ट लोकांच्या आणि धर्माच्या दुकानावर दगडफेक करण्यात आली. आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अमरावतीची परिस्थिती बिघडली. १३ तारखेला जी हिंसा झाली ती १२ तारखेची रिएक्शन होती. मी त्या घटनांचे समर्थन करत नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमरावतीमध्ये १२ तारखेची घटना घडली नसती तर १३ ची घटना घडली नसती असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारची सगळी कारवाई ही १२ तारखेच्या घटनेवर चालली आहे. त्यावर एकही सरकारी पक्षाचा नेता बोलायला तयार नाही. चुकीच्या घटनेकरता लांगुलचालन होत असले तर आम्ही शांत बसणार नाही. एकीककडे अशा प्रकारे न घडलेल्या घटनांवर टार्गेट करायचे आणि दुसऱ्या घटनेच्या कारवाईवर एका बाजूने कारवाई झाली आहे हे योग्य नाही आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारण्यात येत आहे. नेत्यांना अटक करण्यात आली एकाच घनटेसाठी ४ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.