राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण दिमाखात संपन्न… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचे केले अभिनंदन

35

नवी दिल्ली : महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण दिमाखात झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या मान्यवरांना पद्म विभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून शेखर कपूर आणि पंकज उधास (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण आणि अरुंधती भट्टचार्य, मारुती चित्तमपल्ली, पवनकुमार गोयंका, वासुदेव कामत, जसपिंदर नरुला, रोनू मजुमदार, चैतराम पवार यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या देशातील तसेच महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते.

सोमवारी प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.