मुस्लीम समाजाच्या मोर्चाला अमरावतीमध्ये हिंसक वळण

8

अमरावती: त्रिपुरा राज्यात मशिदीत हिंदूंनी तोडफोड केली आहे आणि मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. याचाच निषेध नोंदवण्यासाठी अमरावती शहरात मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली.

15 ते 20 हजार लोकांनी मोर्चाही काढला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील आणि शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली. तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. मोर्चा दरम्यान मोर्चेकरांनी भाजप विरोधात आणि आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले होते तर यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्याने जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान या मुस्लिम समाजाच्या मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले असून शहरात तणाव निर्माण झाला आहे तर या विरोधात भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि भाजप नेते तुषार भारतीय सह भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. तातडीने अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.