एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच आमदार तरी निवडून आणून दाखवावेत – संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिल आहे. राऊत यांनी म्हटले आहे कि, एकनाथ शिंदेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा आणि त्याचे पाच आमदार तरी निवडून आणून दाखवावेत असेही राऊत यांनी म्हटले. कालपासून देशात आणि राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता देशात लोकशाहीच राहिलेली नाही असेही राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, जे आपल्या विरोधात आवाज उठवतील त्यांना न्यायालय , तपासयंत्रणांकडून नष्ट करायचं. विरोधक नष्ट करायचे हेच चाललं आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले कि आम्हाला खोके, मिंधे का म्हणता ? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा असं आव्हानही संजय राऊत यांनी दिल आहे. हिंमत असेल तर आणि तुम्ही सच्चे असाल किंवा जे काही बंड वगैरे केलंय म्हणत असाल ते खरं असेल तर राजीनामा द्या. आत्ता निवडणुका घ्या तेव्हा जनताच दाखवून देईल कि खरी शिवसेना कोणती आणि तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा असं आव्हानच राऊत यांनी दिले आहे.
संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या बाबत देखील विधान केले. राहुल गांधी हे झुकले नाही, गुडघे टेकले नाही. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर त्यांची खासदारकी गेली नसती. पण र्हाऊल गांधींनी कारवाई होऊ दिली. राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलणं म्हणजे हुकूमशाही विरोधात घेतलेली भूमिका आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो असंही संजय राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी यांना संसदेत बोलू द्यायचं नाही म्हणून हा निर्णय घाईने घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली . त्यांनी स्वतः पक्ष स्थापन करून त्याचे पाच आमदार निवडून दाखवा. एकनाथ शिंदे , राज ठाकरे , नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याशिवाय शांत बसू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती मोठं आहे हे समजतं असे राऊत यांनी म्हटले.