शनिवार वाड्याच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर काहीना काही मार्ग निघेल याची खात्री – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2023/04/patil-2-1-750x430.jpg)
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. प्रथम शनिवार वाड्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याबाबत पाटील म्हणाले कि, पुरातत्व खात्याने परिपत्रक काढलं, कि शनिवार वाड्याच्या १०० मीटर परिसरात कुठलाही बांधकाम काढायचे नाही. हा केवळ शनिवार वाड्याचा विषय नाही. देशभरामध्ये ३५० ठिकाणी हा प्रश्न आहे. यामध्ये एक विषय आहे महाराष्ट्र शासनाशी निगडित आहे कि बांधकाम काढताना ९ मीटर अंतर रस्ता सोडणं गरजेचे आहे. या विषयामध्ये राज्य शासन सकारात्मक असल्याचे पाटील म्हणाले.