शिंदे सरकारचे पालकमंत्री अखेर जाहीर: फडणवीसांकडे ‘या’ 6 जिल्ह्यांची जबाबदारी

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे सरकार चांगलेच चर्चे राहले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला होता. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र मंत्रीमंडळ विस्तार झाला पण पालकमंत्र्या विना या सरकारने तब्बल तीन महिने सरकार चावले आहे. अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल तीन महिन्यांनी नवीन पालक मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये 19 जणांवर विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. नियोजन मंत्री म्हणून या जिल्ह्यांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे.
पालकमंत्र्यांची नावे आणि जिल्हे:
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा,
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर