राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ – अजित पवार

राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे फक्त स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचे सांगत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्याची परिस्थिती काय, उत्पन्न किती येणार, खर्च किती आहे याऐवजी ज्या घोषणा करण्यात आल्या त्या पाहिल्यास आणि आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यास कुठेही राज्याला जास्त पैसे मिळतील अशी परिस्थिती नाही, असा शेरा अजितदादांनी मारला.