निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले; ५०० चौरस फुटापर्यंतच्या करमाफीवर आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

43

मुंबई: शिवसेनेने मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंत घरांच्या मालमत्ता कर माफीची जी घोषणा केली आहे. यामध्ये एवढा उशीर का लागला?, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. या मागणीला समर्थन किंबहुना भूमिका आम्हीच घेतली. पण शिवसेनेचं मुंबईकरांवरचं आणि विशेषत: ५०० फुटांच्या घरात राहणाऱ्या मुंबईकरांवरचं प्रेम हे बेगडी आहे. ते पुतणा मावशीचं प्रेम आहे. त्यामुळे त्यांची प्राथमिकता काय आहे, ते स्पष्ट होते, असा टोला आशिष शेलार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला मुंबईकर आठवले. ज्यावेळी तुम्ही ५०० फुटांच्या कर माफीची घोषणा केली. तेव्हापासूनची सूट मुंबईकरांना दिली पाहीजे. मागील ४ वर्षांपासूनचे जे पैसे तुम्ही घेतले असतील तर ते मुंबईकरांना परत द्या, अशी आमची पहिली मागणी आहे. दुसरीकडे कोरोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांना सुद्धा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ५०० फुटापर्यंतचा शून्य कर हे धोरण मध्यवर्गीयांना सुद्धा लागू करा. ५०० फुटापर्यंतचा कर शून्य तर ५०० च्या वर असलेल्या करामध्ये १५० ते २०० रूपये कर असल्यास मुंबईकर भरण्यास तयार होतील. मध्यम वर्गीयांवर अन्याय करू नका.

बिल्डर्संना मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी ११ हजार कोटी रूपये तुमच्याकडे आहेत. तर मुंबईतले छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना सुद्धा सुट का नाही दिली. तुम्ही हे केवळ धुळफेक करण्याचं काम करत आहात. जर तुम्हाला सर्वसामान्य मुंबईकरांना खरचं मदत करायची असेल तर तुम्ही त्यांचे मागील चार वर्षांचे ५०० फुटांचे पैसे परत करा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.