पवार… पवार…. असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना पत्राद्वारे सल्ला

6

खासदार संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका करत असतात. सध्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजप – शिंदे गटावर त्याची गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या या आरोपांवरून मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी संजय राऊत यांना पत्र लिहत प्रेमाचा सल्ला दिला आहे. संजय राऊत यांच्या काळजीपोटी हा पत्रप्रपंच केला असल्याचे देशपांडे यांनी  म्हटले आहे. तसेच पुढे त्यांनी असलं  मिश्किल टिप्पणी केली आहे कि, पटलं तर घ्या… नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा.

संदिप देशपांडे यांनी हे पत्र आपल्या ट्विटरवर वर शेअर केले आहे. त्यांनी या पत्रात म्हटले आहे कि, तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी, असा सल्ला देशपांडे यांनी दिला आहे.

 

संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेण्याबाबत देखील राऊत यांना म्हटले कि, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.
देशपांडे यांनी पत्रात  पुढे म्हटले कि, आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला   जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार… पवार…. असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच केला असल्याचे देशपांडे याची म्हटले आहे. यासोबतच त्यांनी पुढे  म्हटले कि, पटलं तर घ्या… नाहीतर चू ++ आहे असं म्हणून विसरून जा.

Get real time updates directly on you device, subscribe now.