अमेरिका : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेत खेळवल्या जाणाऱ्या टी -२० विश्वचषकात चित्तथरारक असा सामना पाहायला मिळाला. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेतील हे दोंन्ही संघ प्रतिस्पर्धी न्यूयॉर्क नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांविरोधात खेळायला सज्ज झाले. सामन्याच्या शेवटपर्यंत कोणता संघ विजयी होईल हे निश्चित करता येत नव्हते. मात्र अखेरच्या षटकात भारतीय संघाने पाकिस्तानी संघाचा ६ धावांनी पराभव केला.
पाकिस्तनविरुद्ध विजयाची नोंद करून टीम इंडियाने एक मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी बजावली. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, अर्षदीप सिंग यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. भारतीय फलदांची सुरुवात अतिशय निराशा दायक होती. प्रथम फलंदाजी घेत भारतीय संघाने ११९ धाव केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत पाकिस्तानी संघाने २० षटकात केवळ ११३ धावाच केल्या. टीम इंडियाने हा सामान ६ धावांनी जिंकला.
या विश्वचषकात इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा संयुक्तपणे बचाव करणारा संघ टीम इंडिया ठरली आहे. यासोबतच भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ षटके टाकली आणीन २४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी -२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. हार्दिकने सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकत पहिल्या कामंकाचे स्थान पटकविले आहे.