जो धनुष्यबाण चोराला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू… उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

निवडणूक आयोगाने काल दिलेल्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाकरे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निर्णयावर प्रतिकिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले कि, पक्षाचं तणाव गेलं आणि चिन्ह गेलं म्हणजे शिवसेना संपली असं कुणीही समजू नये. ज्यांनी आधी माझे वडील चोरले अशा चोरांना महाशक्ती प्रतिष्ठा देऊ पहाटे आहे मात्र चोर तो चोरच असतो असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेर येऊन एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले.
त्यांनी म्हटले कि, आज महाशिवरात्र आहे, मात्र आपलं शिवधनुष्य चोरीला गेलं आहे. या चोरांना आम्ही धडा शिकवणार आहोत. सगळ्यांनी या चोरांना धडा शिकवू. इ या चोरांना आव्हान देतो कि, तुम्ही जो धनुष्यबाण  चोराला आहे तोच धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे या, मग बघू जनता कुणाला निवडणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मातोश्री बाहेर जमलेल्या लोकांनीही उद्धव ठाकरेंच्या सोबा असल्याचे म्हणत घोषणाबाजी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!