शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘स्वप्नाळू’ अर्थसंकल्पाचे दर्शन – जयंत पाटील

अर्थमंत्र्यांनी आज १६ हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडला, परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटींच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट १६ हजार कोटींवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते. अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे आज दर्शन झाले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
पुन्हा आपल्याला अर्थसंकल्प मांडायचा नाही हा एकमेव मांडायचा आहे या आविर्भावात देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मोठमोठ्या घोषणा आणि जे सात-आठ महिन्यात समोर आले ते सगळे एकत्रित करून जाहीर करण्याचे काम अर्थसंकल्पात करण्यात आले आहे, असा आरोपही त्यांनी केला.