चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील प्राध्यपक भरती प्रक्रियेवर गुरुवारी विधानसभेत चर्चा करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत भरती प्रक्रियेवर भाष्य केले. राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.