असले फालतू धंदे आम्ही करत नाहीत, चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार ; संजय राऊतांचा पलटवार
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2021/09/sanjay-rahut-750x430.jpg)
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद चांगलाच तापला आहे. शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखात २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी करण्यात आलेल्या ‘तोंडास फेस; कोणाच्या?’ या शीर्षकाखालील अग्रलेखाच्या माध्यमातून राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. या टीकेला चंद्रकांतदादांनी पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.आता पुन्हा संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून पाटील यांच्यावर पलटवार केला आहे .
चंद्रकांत पाटील यांना आमच्यावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही फ्रिडम ऑफ स्पीच मानतो आणि म्हणूनच त्यांचं पत्र आजच्या सामनात प्रसिद्ध करण्यात आले . कारण पाटलांची पत्राच्या मध्यमातून लिहिलेली विषारी भाषा राज्याच्या जनतेपर्यंत पोहोचावी.
ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली नाही. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना कायदेशीर सल्ला हवा असेल तर आमचेही कायदेशीर सल्लागार आहेत. मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल या सर्व बाबतीत राज्य सरकारने सर्व बाबी समजून घेऊनच अध्यादेश काढला आहे. तरीही राज्यपालांना एखाद्या गोष्टीचा विलंबच करायचा आहे. सरकारी, कायदेशीर सल्ले वगैरे घ्यायचे असतील तर त्यांना ती मुभा असते. पण कायदेशीर सल्ल्याला किती वेळ लागतो? आता 12 आमदारांच्या नियुक्त्या आहेत. 8-9 महिन्यांपासून ते फक्त कायदेशीर सल्लाच घेत आहेत. असे कोणते कायदे पंडित यासाठी आणले जातात मागवले जातात ते पाहावं लागेल. ठिक आहेत. ते राज्यपाल आहेत. महामहिम आहेत. त्यांच्यावर फार बोलू नये, असं ते म्हणाले.