जर सोमय्यांना प्रवक्ता बनवलं असेल तर ईडीने अधिकृतरित्या जाहीर करावं; मलिकांकडून सव्याज परतफेड

5

मुंबई: ईडीने भाजप नेते किरीट सोमय्या यांना प्रवक्ता बनवला असेल तर ईडीने अधिकृतरित्या जाहीर करावं. माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करा, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं. मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमीनी लाटल्या आहेत. लवकरच त्यांच्या घरी सरकारी पाहुणे जाणार असा दावा किरीट सोमय्या यांनी शनिवारी केला होता. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या यांच्या दाव्यावर किरीट सोमय्या यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोखठोकपणे सोमय्या, भाजप आणि ईडीला ठणकावून सांगितलं. ईडीच्या कार्यालयात जायला तयार आहे. ज्या पद्धतीने ईडी बातम्या पसरवण्याचं काम करत आहे. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन पुण्यात एंडोमन ताबूत प्रकरण आहे, ज्यामध्ये आम्ही एफआयआर दाखल केला होता, त्या प्रकरणी ईडीचे अधिकारी त्या ठिकाणी गेले. तपास सुरु केला. माध्यमांमध्ये बातम्या पसरवण्यात आल्या की वक्फ बोर्डाच्या सात कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे.

त्याच दिवशी आम्ही स्पष्ट केलं की वक्फ बोर्डावर छापेमारी झाली नाही. त्यांना काही तपास करायचा असेल तर ३० हजार रजिस्टर आहेत, आम्ही सर्व कागद द्यायला तयार आहोत. माझ्याकडे माहिती आली आहे. काल वक्फ बोर्डाच्या एका अधिकाऱ्याला दोन दिवसांसाठी बोलावण्यात आलं. ईडीचे अधिकारी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला सांगत आहेत की तुम्ही एफआयआरच चुकीचा दाखल केला आहे. ज्या लोकांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करण्याचं काम ईडीचे अधिकारी करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो किरीट सोमय्या यांना प्रवक्ता बनवला असाल तर ईडीने अधिकृतरित्या जाहीर करावं. जो काही खेळ महाराष्ट्रात सुरु आहे. जर कोणती कारवाई होणार आहे, तर अधिकृतरित्या प्रेस नोट जाहीर करा. माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवून महाराष्ट्रातील नेत्यांना महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करा, असं मलिक म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.