सत्तासंघर्षावर मंगळवारपासून नियमितपणे सुनावणी… गुणवत्तेच्या आधारावर होणार सुनावणी
![](https://firstmaharashtra.com/wp-content/uploads/2023/02/shivsena-750x430.jpg)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सुनावणी पार पडली. हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आजच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले कि येत्या २१ आणि २२ फेब्रुवारीपासून पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण पाच नायमूर्तींकडेच राहणार असून याची नियमित सुनावणी होणार आहे.