शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर, जाहिरातबाजीवर खर्च ;त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या अधोगती – जयंत पाटील

शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणेवर आणि जाहिरातबाजीवर जास्त खर्च होत आहे यामुळे महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या अधोगती व्हायला लागली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालावर जयंतराव पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत पाहणी अहवालाची चिरफाड केली.