आम्हाला तोंड उघडायला लावू नका… अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील – अमृता फडणवीस यांना धमकावल्याप्रकरणी संजय राऊत यांचा इशारा

7

सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस याना धमकवल्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अनिक्षाने १० कोटी रुपयांची  खंडणीची मागणी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी अन्नही एक गोष्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे  यांच्यासोबत अनिक्षा आणि तिच्या वडिलांचा फोटो व्हायरल होत आहे. यावर राजकीय वर्तुळात आणखी चर्चांना उधाण आले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी म्हटले कि, भाजप जर फोटोच राजकारण करत असेल, तर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय यांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत, हे सुद्धा बाहेर येईल. त्यामुळे यावर नन बोललेलंच बरं,  प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. अम्च्यवर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. आम्ही कोणाच्याही कुटुंबीयांपर्यंत जात नाही. त्यांच्या कुटुंबियांना त्रास होईल, असं दळभद्री राजकारण आम्ही कधीच केलं नाही. हि कटुता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी आणि केंद्रात अमित शाह- नरेंद्र मोदी यांनी आणली.
मी ,अनिल देशमुख , नवाब मलिक आम्ही तुरुंगात गेलो. पण कारण काय ? आमच्यावर  जे आरोप होतात, ते खरे आणि तुमच्यावर जे आरोप होतात ते खोटे? तुमचे कुटुंबीय तुरुंगात जातील. इतके पुरावे आमच्याकडे आहेत. पण आम्ही तुमच्या कुटुंबीयांपर्यंत जाणार नाही. आम्हाला तोंड उघडायला लावू नका , अन्यथा महाराष्ट्रात राजकीय स्फोट होतील , असे राऊत  यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.