शिवसेना हि बाळासाहेबांची शिवसेना आहे, हेच या महाराष्ट्राचे सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे – संजय राऊत

8

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा आजचा तिसरा दिवस. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज कौल यांनी युक्तिवाद केला.  आज ठाकरे गटाकडून प्रतिवाद झाला. आज या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार कि सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर जाणार ? हे आता  लवकरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धी वर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी म्हटले कि,   सर्वोच्च न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सद्सद्विवेकबुद्धी वर आमचा विश्वास आहे. रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत. म्हणून न्यायालय जिवंत आहे. शिवसेना हि  बाळासाहेबांची शिवसेना आहे. हेच या महाराष्ट्राचे सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे, असे राऊत यांनीं  म्हटले.
राऊत यांनी पुढे म्हटले कि, शिवसेना कोणती खरी आणि कोणती खोटी हे जनता ठरवेल. उद्या न्यायालयाने निवडणुकीला  सामोरे जाण्याचे निर्देश दिले तरी आमची तयारी आहे. हा निकाल भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि  हा निकाल देशासाठी दिशादर्शक ठरावा हीच आमची भूमिका आहे , असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.