नागरिकांशी थेट भेट व संवाद या उपक्रमाची चंद्रकांत पाटील यांनी आजपासून केली सुरुवात

पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज महात्मा सोसायटी परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी थेट भेट व संवाद या उपक्रमाची आजपासून सुरुवात केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, आज नागरिकांसोबत साधलेल्या संवादात प्रामुख्याने पाण्याच्या प्रश्नासह महात्मा सोसायटीत बसविण्यात आलेल्या स्पीड ब्रेकर संदर्भात अनेकांनी तक्रारी मांडल्या. यंदा पर्जन्यमान कमी असल्याने महापालिका आणि जलसंपदा विभाग पाण्याचे नियोजन करत आहे. सध्या महापालिकेला शहरात कुठेही पाणीकपात करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. पण तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाटील यांनी केले.
